Monday, June 19, 2017

कोण आहेत राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद?



सत्ताधारी भाजप पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीस विश्वासात घेऊन बिहार चे राज्यपाल श्री. रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी सुचवले आहे. रामनाथ कोविंद यांच्या नावाने दलित समाजाच्या अपेक्षा वाढतील असे चिन्ह आहेत.

  • बिहार चे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचा जन्म १ ऑक्टोबर, १९४५ रोजी कानपुर जवळ डेरापुर येथे झाला. 
  • श्री रामनाथ कोविंद दलित समाजातील असून त्यांनी भाजपच्या दलित आघाडीचे १९९८-२००२ मध्ये नेतृत्व केले होते. 
  • कानपुर कॉलेज मधून वकिलीची पदवी त्यांनी घेतलेली आहे. 
  • दोन वेळा भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत यश न मिळाल्याने त्यांनी वकिलीत करीयर घडवायचे ठरवले. त्यानंतर एक वेळा त्यांची प्रशासकीय सेवेसंतही निवड होऊन देखील त्यांनी त्यास नकार दिला. 
  • १९७७-९३ पर्यंत श्री रामनाथ कोविंद यांनी सरकारी वकील म्हणून दिल्ली उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टात काम पहिले. 
  • १९९४ ते २००६ मध्ये त्यांची राज्यसभेत खासदार पदी राहून काम सांभाळले. दोन्ही वेळा उत्तर प्रदेश मधून त्यांनी निवडणूक जिंकली. 
  • कोळी समाजाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या रामनाथ यांनी २०१५ मध्ये बिहार च्या राज्यपालाची भूमिका स्वीकारली. 
एका संभाव्य राष्ट्रपतींना पुढील वाटचालीस शुभेच्छा! शेतकरी दलित पुत्रास अशा मोठ्या मानाच्या पदापर्यंत पोचवण्याची ताकद असलेल्या या लोकशाहीस अभिनंदन!! 


Wednesday, May 31, 2017

गंगाखेड परभणी रस्ता अशक्य?

चर्चा.. आपण चर्चा करतो मित्रांशी, गावातल्या, राज्यातल्या, देशातल्या आणि कुठल्यापण. बऱ्याच वेळा आपल्या गावच्या गोष्टी सांगतो. गंगाखेडयातल्या माझ्या मित्रांचा सामान्य ज्ञान भारीच! पण मला शंका वाटते त्या समोरच्या व्यक्तीला आपल्या गंगाखेड बद्दल काही माहिती असेल. ज्या शहराचा ३०० वर्षांपासूनचा इतिहास लिखित आहे, त्या शहराला तर नावावरून ओळखला पाहिजे लोकांनी. पण तसं होत नाही. याचं कारण आहे, आपल्याइथं असं काही उरलं नाही. आणि जे काही थोडंफार उरलाय ते सांभाळण्याची आपली इच्छा नाही!
                 गंगाखेड शहर जिल्ह्याला गंगाखेड-परभणी मार्गावरून जोडला जातो. इथल्या रोजच्या वर्दळीची कल्पना असेल तुम्हाला. गंगाखेड बाजारपेठेचं विशिष्ट नावलौकिक आता पुसट व्हायला आलय पण थोडीफार ओळख असल्याने कामे भागतात. इंडस्ट्री च्या नावावर एक साखर कारखाना आहे. शहराबाहेर वसत असलेल्या नवीन मोंढ्यात एक पाईप फॅक्टरी आहे. ४-५ कापूस जिनिंग पण आहेतच. पण नावाला उरलेली कनेक्टिव्हिटी!
मागील ३ वर्षांपासून २ मुद्दे ऐरणीचे मानले जातात. पुण्याला जाणाऱ्या रेल्वे गाडीला गंगाखेडला थांबा मिळावा आणि गंगाखेड परभणी रस्ता पुन्हा बनवा.
                  २०१५-१६ साली हायवे च्या प्रस्तावनामध्ये एक रस्ता परळी ते पुसद मार्गे दिग्रस एक राष्ट्रीय मार्ग ७०७ किमी अंतराचा बनवा असा प्रस्ताव आलेला. त्यात गंगाखेड ते परभणी रास्ता अर्थातच समाविष्ट होता. २ पदरी मागणाऱ्यांना ४ पदरी देणारं सरकार महानच! पण तसं अद्याप काही झालं नाही! या रस्त्यासाठी ३८ वर्षांपूर्वी एकदा निधी आला होता. त्यावेळी रस्ता बनला. ७-८ वर्षां पूर्वी पर्यंत इथे टोल वसुली करण्यात आली. रस्त्याची डागडुजी झाल्याचे मात्र दिसत नाही. एकंदरीत गंगाखेडच्या व्यापारावर याचा जबर फटका बसलेला दिसतो. इतकं वाचून झाल्यावर याची कल्पना तुम्हीपण करू शकता.
                                                        आता एकत्र येऊन यासाठी मागणी करायची गरज आहे. त्यासाठी हि ऑनलाईन पिटिशन मी दाखल केली. सन्मानणीय मंत्री महोदयांपर्यंत जेव्हापण आपली गोष्ट पोचेल ती एकत्रित पोचेल.


https://www.change.org/p/government-of-india-reconstruction-of-gangakhed-parbhani-state-highway

या संकेत स्थळावर जाऊन तुम्ही स्वतःची माहिती भरावी.


First Name मध्ये आपलं नाव, Last Name मध्ये आपलं आडनाव, Email मध्ये आपली ईमेल आयडी, Postal Code मध्ये ४३१५१४ (आपला पिनकोड) आणि I'm signing becuase मध्ये आपल्याला हा रस्ता का बनावा असे वाटते? ते लिहावे. त्यानंतर SIGN वर क्लिक करून शी करून टाकावी. 

   सदर संकेत स्थळ Change.Org आपली विनंती जास्तीत जास्त सह्या झाल्यास 'ट्रेंड'मध्ये दाखवते. यापूर्वी मनेका गांधी, सुशील कुमार शिंदे, इत्यादी मंत्र्यांनी अशा पिटिशन ची दखल घेतलेली आहे.

बाकी वरील छायाचित्रांकडे पाहून तुमच्या स्वप्नातले गाव आणि त्याला जाणारा रास्त असा नसेल तर सही करून याबाबत जनजागृती करण्यासाठी मदत करावी!
धन्यवाद! 

Wednesday, May 3, 2017

(हिंदी) My Speech at Rajasthani Yuva Manch's Felicitation Program.

संत जनाबाई की पवनपुण्य नगरी और रानी सीताबाई की धरोहर गंगाखेड़ शहर में आपका हार्दिक स्वागत करता हूँ। समाज का यहाँका  इतिहास भी अब काफी गौरवशाली एवं विकसनशील दिखाई पड़ता है। और हम सबकी प्रतिमा को और उजागर करते हुए नगरीया के प्रथम नागरिक श्री विजयकुमारजी तापड़िया (अंकल) का मै हार्दिक अभिनन्दन करता हूँ। गौरतलप की बात तो ये है की जब सारस्वत और माहेश्वरी समाज दख्खन की तरफ पहली बार निकला था तब बीसवीं शताब्दी के शुरुवाती दौर में शहर की जनसँख्या ६००० के करीब थी। इस चुनाव में अंकलजी करीब उतनेही वोट लेके जित दर्ज कर चुके हैं!

हालहिंके हुए चुनाओने बोहोत सी बातें स्पष्ट की है। मोर्चाओंके और आंदोलनसे भरे इस दौर में हम यहाँ इतने अधिक मात्रा में नगराध्यक्ष और पार्षद बने है। सामाजिक संघर्ष का हमारे लोकसंपर्क और लोगोंके हमारे प्रति भाव पे कोई परिणाम नहीं दिखाई पड़ता। हमारे समाज की सर्वसम्मीलीत नीति का ये परिणाम मानता हूँ। और व्यासपीठ पे विराजित सभी व्यक्तिविशेषोंसे अगर कोई ज़्यादा मात्रा मे  जीत हासिल किये बैठा है तो वो है मेरा समाज।
कुछ दिनों पहले मेरे करीबी मित्र ने पूछा,'यार, तेरा पूरा समाज विजूसेठ के साथ चला! हवा बन्दी मार्केटमें! बड़ी एकता है!"
मैंने कहा,"हाँ! यहितो ख़ास बात है हमारी!"
वो फिर बोला," तोह फिर तेरा परिवार ही अलगसे सिर्फ अपनी पार्टीके साथ क्यों खड़ा रहा?"
मैं पलटके बोला," ये भी तो खास बात है!"
देखो, बस यही है!  समाज के संस्कार न समाज से बैमानी सिखाते है और ना ही अपने दलसे! इससे हम आखिरमें कहिनाकहीं जाके अच्छे दौर की शुरुवात में अपने पैर  फसा ही देते है। आज इसी अच्छे दौर की शुरुवात में मैं आपसे कुछ अपेक्षाओंकी बातें करना चाहता हूँ।
४ नगराध्यक्ष और पचास से ज़्यादा पार्षद, चलिए इसीको अपनी शुरुवात मानते है। अलग अलग पार्टियोंसे भलेही हमारा नाता हो, लेकिन एक दूसरे की सहाय्यता करनेसे हम न चुके इसीमें हमारी भलाई! अपेक्षा मेरी इतनीही है की आपकी राजनैतिक यात्रा यहीं न थमके रह जाए। आप हमारे लिए इस जनमानस को दिलसे लगाएं  काम करें। घड़ियोंके, गाडीयोंके  और बेपार की पीछे दौड़ते इस समाज से उभरकर आप राजनीति की और चल दिए हैं। इस गति को और बढ़ाए। आप में से कइयोंका सपना आगे बढनेका ज़रूर होगा। और आपको आदर्श मानती इस युवा पीढ़ीका हर मेरे जैसा कुँवर आपके साथ है! समाज को आधिकारिक रुप से मुख्यमंत्री पद  हिरा लाल देवरा  जी के रूप में सिर्फ १७ दिन के लिए एक ही बार मिला था। कामना करता हूँ की आपमेंसे कोई और या आपको सरआँखोंपे रखे समाज का कोई और व्यक्ति वहांतक पहूंचे। जननिर्वाचित नगराध्यक्ष के इन चुनावमें आपने जित हासिल तो की है मगर आगे विधायक बनने की प्रेरणा से काम करियेगा। सांसद बनके और उच्च तौर पे भूमिका निभाने के लिए काम करियेगा। आपका प्रभाव इन्ही पांच वर्षोंमें खत्म न हो ये मेरी दिलसे भगवान् को की कामना होगी। और हाँ देवरा जी राजस्थान के मुख्यमंत्री रहे। वहाँ अपने विधायक संसद हो सकते है। यहाँपे कठिनाइयां हज़ार हो सकती है। पर ये हमारी कर्मभूमि है। सिर्फ जन्मभूमीही नहीं!!
इस बात का भी गर्व महसूस करता हूँ की तापड़िया जी ने अध्यक्ष पद की कमान संभाले पहली ही सभा में  शिवछत्रपती महाराज की पुर्नाकृति मूर्ति की स्थापना का फैसला किया है। इस वतन के लिए इस प्यारभरी भूमिका का हार्दिक स्वागत करता हूँ!


'सक्षम' होतंय गंगाखेड?

'एक एप्रिल पासून  प्लास्टिक पिशव्या बंद!' सन्माननीय नगराध्यक्ष महोदयांच्या सूचनेचं गंगाखेडतील नागरिकांनी स्वागत केलं. बऱ्याच अंशी अशा योजना शहरात काम करतांना दिसत आहेत. गंगाखेडातील नागरिक जागरूक होतो आहे.

                          २००५-०६ च्या शहरात शिकलेल्या १०वि च्या तुकडीने यावर्षी आपल्या कामाच्या आपापल्या कार्यक्षेत्रातील तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात पदार्पण केलं असावं. शाळेतील आठवणींना उजाळा देण्यासाठी विविध सोशल माध्यमांतून गप्पा रंगवायला असंख्य Chatting Box पडलेली. फेसबुक आणि व्हाट्सअँप द्वारे बैठक जमली. तारीख ठरवून मंडळींनी Get Together चं आयोजन केलं. शाळेतील आपल्या शिक्षकांना बोलावलं आणि गोदातीरी भरलेल्या बैठकीत ठरवलं एक सामाजिक कार्य हातात घ्यायचं.


                         मित्रमंडळ आणि संघटना आपण भरपूर पहिल्या शहरात. चौकाचौकात सजलेली फ्लेक्स आपल्याला आपल्या एकटेपणाची जाणीव करून देत असतातच! पण इथं उद्धिष्ट ठरवून चांगली कार्य हातात घेणारी समिती नावालापण उरली नाही. अशावेळी एकत्र येऊन 'सक्षम' ची स्थापना केली. तसे २ महिनेच झाले या निर्णयाला. पण गोष्ट उल्लेखनीय आहे. कशी ते पहा. 
  • विविध क्षेत्रात काम करणारे 'सक्षम' सदस्य यांच्यापैकी गंगाखेडात राहणारे सदस्य खूप कमी आहेत. 
  • ठराविक कालांतराने 'फंडिंग' जोडून शिक्षकांना संपर्क साधण्यात येतो. शाळेतील हुशार व गरजू विद्यार्थी शिक्षणाअभावी राहून जाऊ नयेत यासाठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत. 
  • गणवेश, फीस, वह्या-पुस्तके, इत्यादी शालेय शिक्षणात गरज असलेल्या वस्तू पुरवण्याचं उद्देश्य घेऊन मोहीम वाढवली जाते आहे. 
  • सामाजिक माध्यमांद्वारे कामाची प्रसिद्धी केली जाते, पण यामागे कोण काम करतंय हे नाही दाखवले जात! 
  • फेसबुक वर एक पान आहे Saksham Gangakhed  या नावाने. इथे तुम्हाला यांची कामे पाहायला मिळतील. 
युवकांचा सामाजिक कामांकडे वाढत कल पाहून मनातून समाधान बाळगणारी शिक्षक मंडळी कौतुकाने 'सक्षम'बद्दल बोलत आहे. चांगल्या कामांचा प्रसार व्हायला हवा. त्यासाठी सगळ्यांनी मदत करणं पण आवश्यक.
Get Together साठी जमलेली २००५-०६ ची तुकडी 

                          डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, उद्योजक, इत्यादी कार्यक्षेत्रात रुजलेली हि तरूण 'सक्षम'द्वारे सामाजिक कामांसाठी उतरली आहे. २००५_०६ च्या तुकडीचा आदर्श Get Together डोळ्यांसमोर ठेवून चालणाऱ्यांनी लक्षात ठेवावा. विवेक महाजन आणि निकिता लोढा यांच्याशी संपर्क करून मदत करू शकता! 



Wednesday, April 26, 2017

Average Indian के मन की बात..

An open letter to the Prime Minister of India..

भारत
के 'लोकप्रिय' प्रधानमंत्री,
आदरणीय नरेंद्र मोदीजी,
                         चुनाओंका दौर चलता रहता है हिंदुस्तान में. आपभी प्रयास कर ही रहे हैं की सारे चुनाव एकसाथ हों! ऐसेमें उस विषय में हाथ डालना उचित नहीं, पर बात अब इस 'एवरेज इंडियन' के दिलों दिमाग पर असर कर रही है तो वो बातें उगलेगा ही।
  असंतोष तो है साहब! जब २०१२ में आप गोवा में मराठी में चुटकी लेते हुए भाषण की शुरुवात किये थे तो मेरे जैसा वो हर मराठीएवरेज इंडियन’ जानके बैठा था की ये, बस ये व्यक्ती ही देश का अगला प्रधानमंत्री होगा। उसके बात आपने हर राज्य में हम जैसे लोगोंका समर्थन पाया होगा। बात ऐसी ही तो है, की हम ही वो हैं जिसे दिल्ली-कलकत्ता जैसे शहरोंमें बड़े विश्वविद्यालयोंमें बैठे उदारवादी चरित्र वाले लोग 'Cult' मानते है। उन्हें लगता है की हम ही भक्त बन सकते है किसीके। हम ही शायद वो लोग है जो क्लिकबैट वाली खबरोंपर लाइक, कॉमेंट और शेअर का बटन दबाकर गर्व महसूस करते हो। और हम ही वो है जो दिन रात 'Visual दुनिया' में अपने देश के लिए जंग लड़तें हो। असलीयत में एवरेज इंडियन कुछ ऐसा ही होता है। पर एक बात वो नहीं जानते की एवरेज इंडियन उतनाही गरियाता भी है!!
                                      हाल ही में सुकमा में हिंदुस्तानी जवानो पर हमला हुआ। CRPF के २४ शहीद अब अलविदा कह गये। उसके घरवालोंका और दोस्तोंका दर्द हम और आप नहीं समझ सकते। हम समझ बस एक ही चीज सकते हैं, 'बदला'! क्यूंकि हम हैं ही, एवरेज इंडियन!! वो टीवी डिबेट में बड़े विश्वविद्यालयोंके प्राध्यापक और प्राध्यापिका जिन 'Human Rights' की बात करते हैं उनका हमें ज्ञान होता ही नहीं है। उन जवानोका नहीं होता तो नक्सलियोंका कैसा 'Human Right'? पण्डितोंका नहीं होता तो बाकी कश्मिरियोंका कैसा 'Human Right'? और अगर किसान का नहीं तो उन बड़े कारोबारियोंका कैसा 'Human Right'? एवरेज इंडियन की इस सोंच वाला पहलु आपने शायद देखा ही नहीं होगा। हमें बस चुनाव में ही क्यों लगे की मोदीजी जनता की मनोदशा भाँप जाते हैं? आपसे एक दरख्वास्त इतनी भी है कभी वेश बदलकर किसी मिडल क्लास फैमिली के घरके खिड़की पे तब कान लगाइएगा जब वो थका  हुआ काम से लौटकर टीव्ही के सामने बैठा होगा, टीव्ही पे 'सुकमा' या 'उरी' जैसी कोई खबर हो और राजनाथ जी का वो ही सुनहरा सा बयान आए, कड़ी निंदा वाला! बस उसी वक़्त आप जनता की असली मनोदशा समझ चुके होंगे!
                                            ५६ इंच का सीना और सर्जिकल स्ट्राइक वाली दहाड़ कोई 'बाहुबली' जैसी 'Once in a life time' चित्रकथा बनके रह जाए।  आप देश के सब से अच्छे प्रधानमंत्री हैं, सोचा आप ही सुनलेंगे हम जैसे एवरेज इंडियन की बात! अब खून खौलने दीजियेगा।  क्यूंकि हम ये भी जानते है की आप भी दिल ही दिल में हम जैसे एवरेज इंडियन ही है!

                       

Thursday, March 9, 2017

वाटून दिलेलं Freedom of Speech

मी गुरमेहर बद्दल लिहिलं आणि त्यानंतर लागोपाठ बऱ्याच वर्तमानपत्रांनी आपल्या अग्रलेखांमध्ये तिच्या चांगल्या बाजू समोर ठेवण्याचा प्रयत्न केला हे सर्व योगायोग! पण कमाल आहे, खोट पडत असलेल्या एका तरुणीला वाचवायला संपूर्ण 'आदर्श Liberal' समाज कसा जागा होतो. आणि ती खोटी पडली कशी ते मागील ब्लॉग मध्ये सांगितलंच आहे. हा blog लिहिण्याचं कारण इतकाच की 'Selective Outrage' नावाची गोष्ट आता डोक्यात भणभणायला लागली आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त निवडक लोकांसाठी मर्यादित उरलय.

गुरमेहर कौर आणि ती Endorse करत असलेली संपूर्ण टीम फक्त निवडक गोष्टींवर चर्चा करायला तयार असते हे कधी लक्षात घेतलं का आपण? मी 'सुरेश भटेवरा' यांचं लेख वाचलं लोकमतच्या संपादकीय पानावर आणि 'गुरमेहर किती चांगली, कशी चांगली, किती गुणी आणि कशी गुणी' असा निबंध वाचल्यागत वाटायला लागलं. पुण्य-नगरीच्या संपादकीय पानाचं पण मला तितकाच कुतूहल वाटतं. उमर खालिद ला भाऊ मानणारी एक नवीन 'Generation' तयार झाली आहे आणि तिचा आणि आमचा काही अर्था-अर्थी संबंध नाही! या संपूर्ण डाव्या आघाडीला समर्थन करणाऱ्या पत्रकारांच्या टोळीला डाव्यांचं राज्य केरळ पाहायला हवं आणि पुन्हा असहिष्णुता बद्दल बोलायला हवं. त्यावेळी माझ्यासारखे तरुण त्यांना 'जाणीवपूर्वक बोला.' अस देखील म्हणणार नाहीत. १९५७ पासून सत्ता असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या केरळमध्ये शरीरसंबंधी गुन्ह्यांचा दर ७५३ इतका आहे. राष्ट्रीय सरासरी २४७ असतांना हा अंकाची कमाल वाटू नये का? सर्वात साक्षार केरळ राज्यात गुन्हे कोणासोबत होतात हे सांगायला नको. 'RSS in Kerala' इतकाच शोध पुरेसा आहे गुगलवर.     
डाव्या आघाडीची नीती वेळोवेळी समजावून सांगितली पाहिजे असं 'संघ' चे विचारक प्रत्येक चॅनल वर सांगत असतात.
आता अजून एक प्रश्न मनाला विचारू शकतो आपण. एकदाचं 'भारत माता कि जय आणि वंदे मातरम' बोलून मिटवून का नाही टाकत हे लोक? कविता कृष्णन, उमर खालिद, येचुरी आणि आता महेश भट्ट यांना पण इतकं फिरवून स्पष्टीकरण देण्यापेक्षा एकदाच बोलून टाकलेलं चांगलं का नाही वाटत? याने एक तर इतका मोठा संघर्ष वाचतो. त्यात तुम्ही ज्यांना 'नकली राष्ट्रवादी' म्हणता त्यांची पण तोंड बंद होऊन जातील. शिवाय पुन्हा तुम्हाला कोणीही देशभक्तीची गाणे गायला प्रवृत्त करणार नाही. पण तुम्ही ते बोलणारच नाहीत. याचं  'संघाच्या दबावाला बाली न पडणे' इतकं साधं सोपं कारण नाही.
              थोडं 'Fact to Fact' चालून पाहू. काश्मीर बद्दल बोलणारी 'लिबरल' मंडळी तुम्हाला गाझा बद्दल पण बोलतांना दिसेल. पण काश्मिरी पंडित आणि बलुचिस्तान बद्दल बोलतांना नाही दिसणार? यातून आपण मुळातच मुद्द्यावरून भटकत नाहीत. चारही गोष्टी तुमच्या मताप्रमाणे एकसोबत ठेवता येत असतील. मग हरकत काय? सीरिया साठी आंदोलन केलेली मंडळी पश्चिम बंगाल मधील 'मालदा आणि पूर्णिया' यांना विसरून का जाते?
उमर खालिद ला त्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं नाही तर खेद  वाटायला पाहिजे. तितकाच खेद 'तारेक फतेह' यांच्यासाठी पण बाळगून चला. गुरमेहर च्या पूर्ण साप्ताहिकात 'प्रेरणा भारद्वाज' प्रकरण डोळ्यांसमोरून निसटून गेलं आपल्या. विश्वरूपम ला झालेला विरोध आणि पद्मावती साठी एकत्र आलेला 'Bollywood' आपला दशकांपासून आदर्श राहिलाच आहे.

                                   तुम्हाला देशभक्तीसाठी प्रवृत्त करणारी मंडळी घातक असेलही. पण त्यांना सरळ नका सोडून देऊ ज्यांनी तुमच्या विचारांना सुरुवातीपासून काबीज करायचा प्रयत्न केलाय.
अभिव्यक्ती
स्वातंत्र्य (Freedom of Speech) साठी अमेरिकेचं उदाहरण देणाऱ्या प्रत्येकास ठाऊक असायला हवी अशी एक गोष्ट सांगतो, अमेरिकन कायद्याप्रमाणे देशांतर्गत सरकारविरुद्ध अथवा देशाविरुद्ध बोलणाऱ्या किंवा त्यासाठी कट रचणाऱ्या व्यक्तीस तुरुंगात डांबलं जातं. त्याचबरोबर त्या पत्रकारांना देखील ज्यांना अशा व्यक्तीसाठी चांगलं बोलण्याची हौस आहे. अर्थात तिथे अशा लोकांची काळजी दर्शवणे हा देखील गुन्हाच आहे. एक अजून महत्वाची माहिती हवी असेल तर सांगतो. 'उमरखालीद' चे वडील 'SIMI' मध्ये कार्यरत राहिलेले आहेत. हि माहिती आपल्यास ज्ञात असावी, बस इतकचं..


Tuesday, March 7, 2017

आमचा चिंतनकाळ...

१९ ऑक्टोबर २०१४, गंगाखेड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आजपर्यंतचा सर्वोत्तम दिवस. १९ तारीख निकालाची असल्या कारणाने केंद्रे साहेबांचे योग चांगले असावेत अशी सर्वसाधारण 'पोलिटिकल पंडितांची' मन-धारणा! पैसे वाटपाच्या कार्यक्रमांनी उडालेला गोंधळ गंगाखेड मतदारसंघाचं नाव मोठ्या चर्चेत आणून बसवणारं. महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या मतदारसंघांपैकी एक गंगाखेड आपलं कौल देतं ते राष्ट्रवादीच्या बाजूने! वर्षांपूर्वी गंगाखेड शहरात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शोधून सापडायचा, आज २०१४ मधे  चक्क आमदार येणं आणि तेही निव्वळ जनसमर्थन आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर हा हादरवून टाकणारा मुद्दा. धडपड, सतत संघर्षाची वेळ आणि अगदी ग्राउंड झिरो वक्तव्य या गोष्टींनी केंद्रे साहेबांना मदत तर केली. पण त्याचबरोबर पवार साहेबांच्या पार्टीला 'जनाई नागरी'त चांगला काळ पण पहायला मिळाला.     
      २०११ च्या नगरपरिषद निवडणुकीनंतर गंगाखेड शहराने रोज राजकारण पाहिलं. भांडण-तंट्यासारख्या सुप्त गुणांना मागे ठेवून अडकवण्याची नवीन शैली हस्तगत केली इथल्या राजकारण्यांनी. सलग ३ वर्ष नाट्यमय घडामोडीनंतर विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने गंगाखेड 'शहराने' राष्ट्रवादीला समर्थन केले. पैश्यांच्या मागोवावर चालणार मतदारसंघ अशी ओळख पुसून काढली! पण तिथेच काही राष्ट्रवादी बहरली अशातला भाग नाही! अर्थकारणाच्या बाबतीत थकून गेलेले कार्यकर्ते सांभाळणं आता जरुरी होतं. साधा कार्यक्रम घडवून आणायचं म्हटलं की धावपळ व्हायला लागली. जिल्हा अध्यक्ष बदलल्यामुळे पहिल्या फळीतील कार्यकर्ते पुन्हा घौडदौड करायला टाळतांना दिसायला लागले. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना किंमत मिळत नाही अशी साधारण मनधारना लोकांमध्ये पसरायला लागली.
     २०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीची तारे कुठपर्यंत जुळतील याचा काहीच नेम नाही. रासप च्या प्रदेश उपाध्यक्षांच्या मनावर चालणारी भाजप यावेळी स्वबळावर उभा टाकलेली दिसली. ५ उमेदवारांच्या शर्यतीती कसोशीने झटणाऱ्या काँग्रेस ला विजय मिळवता आला. गंगाखेड हि खरी राजकारणाची 'गंगा' मानावी लागेल. आपल्या अधिकाराचा रास्त फायदा घेणारी जनता सर्व नेत्यांना थोडं थोडं वाटून देते. राज्यात भाजप चा मुख्यमंत्री, खासदार शिवसेनेचा, आमदार राष्ट्रवादीचा आणि नगराध्यक्ष काँग्रेस चा. त्यावर आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही म्हणणारी तरुण मंडळी.
  योग्य कार्यकर्त्यांना वेळीच न दिलेल्या संधी, अपर्याप्त भेटींनी विचारात पडलेली जनता, विकासकामे करून देखील त्याचं 'मार्केटिंग' मार्गी न लावता येणं आणि सामाजिक धास्तीने षंड पडलेला कार्यकर्ता यातून झालेलं खच्चीकरण पहिले नगरपरिषद आणि आता जिल्हा परिषदेच्या निकालातून स्पष्ट झालं.  तुष्टीकरणाचं राजकारण न आवडणारा सामान्य कार्यकर्ता भटकायला लागला हे देखील महत्वाचं. उभय नेत्यांना चांगलं मानणारी लोकं त्यांना भाजप मधल्या काळात जुळलेली आहेत हे आपण समजून घ्यायला हवं होतं. गल्लीतल्या राजकारणात दिल्लीत बसलेल्या लोकांवर टीका करून काहीही साध्य होणार नाही हे समजण्याची गरज आहे आपल्याला. खऱ्या खुऱ्या मानाने धावणारी माणसं समजून घेण्याचं कर्तव्य पार पाडायला हवं आता आपण.  प्याद्यांचं राजकारण समजून गंगाखेड त्यात पूर्णपणे 'Mature' झालेला आहे. ते मुळातच फेकून द्यायला हवं.
   नव्या उमेदीनं सोबत चालायला कार्यकर्ते तयार असतील तर काय हरकत आहे? चांगल्या माणसांनी सदैव साथ असतांना आज ती जवळ भिरकायला का तयार नाहीत हे आपण समजून घ्यायला हवं. आत्मिक बदल कितपत गरजेचं आहे हे अशा वेळीच कळतं. साहेब, कोलमडलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चला आता एवढीच मागणी!