Thursday, March 9, 2017

वाटून दिलेलं Freedom of Speech

मी गुरमेहर बद्दल लिहिलं आणि त्यानंतर लागोपाठ बऱ्याच वर्तमानपत्रांनी आपल्या अग्रलेखांमध्ये तिच्या चांगल्या बाजू समोर ठेवण्याचा प्रयत्न केला हे सर्व योगायोग! पण कमाल आहे, खोट पडत असलेल्या एका तरुणीला वाचवायला संपूर्ण 'आदर्श Liberal' समाज कसा जागा होतो. आणि ती खोटी पडली कशी ते मागील ब्लॉग मध्ये सांगितलंच आहे. हा blog लिहिण्याचं कारण इतकाच की 'Selective Outrage' नावाची गोष्ट आता डोक्यात भणभणायला लागली आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त निवडक लोकांसाठी मर्यादित उरलय.

गुरमेहर कौर आणि ती Endorse करत असलेली संपूर्ण टीम फक्त निवडक गोष्टींवर चर्चा करायला तयार असते हे कधी लक्षात घेतलं का आपण? मी 'सुरेश भटेवरा' यांचं लेख वाचलं लोकमतच्या संपादकीय पानावर आणि 'गुरमेहर किती चांगली, कशी चांगली, किती गुणी आणि कशी गुणी' असा निबंध वाचल्यागत वाटायला लागलं. पुण्य-नगरीच्या संपादकीय पानाचं पण मला तितकाच कुतूहल वाटतं. उमर खालिद ला भाऊ मानणारी एक नवीन 'Generation' तयार झाली आहे आणि तिचा आणि आमचा काही अर्था-अर्थी संबंध नाही! या संपूर्ण डाव्या आघाडीला समर्थन करणाऱ्या पत्रकारांच्या टोळीला डाव्यांचं राज्य केरळ पाहायला हवं आणि पुन्हा असहिष्णुता बद्दल बोलायला हवं. त्यावेळी माझ्यासारखे तरुण त्यांना 'जाणीवपूर्वक बोला.' अस देखील म्हणणार नाहीत. १९५७ पासून सत्ता असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या केरळमध्ये शरीरसंबंधी गुन्ह्यांचा दर ७५३ इतका आहे. राष्ट्रीय सरासरी २४७ असतांना हा अंकाची कमाल वाटू नये का? सर्वात साक्षार केरळ राज्यात गुन्हे कोणासोबत होतात हे सांगायला नको. 'RSS in Kerala' इतकाच शोध पुरेसा आहे गुगलवर.     
डाव्या आघाडीची नीती वेळोवेळी समजावून सांगितली पाहिजे असं 'संघ' चे विचारक प्रत्येक चॅनल वर सांगत असतात.
आता अजून एक प्रश्न मनाला विचारू शकतो आपण. एकदाचं 'भारत माता कि जय आणि वंदे मातरम' बोलून मिटवून का नाही टाकत हे लोक? कविता कृष्णन, उमर खालिद, येचुरी आणि आता महेश भट्ट यांना पण इतकं फिरवून स्पष्टीकरण देण्यापेक्षा एकदाच बोलून टाकलेलं चांगलं का नाही वाटत? याने एक तर इतका मोठा संघर्ष वाचतो. त्यात तुम्ही ज्यांना 'नकली राष्ट्रवादी' म्हणता त्यांची पण तोंड बंद होऊन जातील. शिवाय पुन्हा तुम्हाला कोणीही देशभक्तीची गाणे गायला प्रवृत्त करणार नाही. पण तुम्ही ते बोलणारच नाहीत. याचं  'संघाच्या दबावाला बाली न पडणे' इतकं साधं सोपं कारण नाही.
              थोडं 'Fact to Fact' चालून पाहू. काश्मीर बद्दल बोलणारी 'लिबरल' मंडळी तुम्हाला गाझा बद्दल पण बोलतांना दिसेल. पण काश्मिरी पंडित आणि बलुचिस्तान बद्दल बोलतांना नाही दिसणार? यातून आपण मुळातच मुद्द्यावरून भटकत नाहीत. चारही गोष्टी तुमच्या मताप्रमाणे एकसोबत ठेवता येत असतील. मग हरकत काय? सीरिया साठी आंदोलन केलेली मंडळी पश्चिम बंगाल मधील 'मालदा आणि पूर्णिया' यांना विसरून का जाते?
उमर खालिद ला त्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं नाही तर खेद  वाटायला पाहिजे. तितकाच खेद 'तारेक फतेह' यांच्यासाठी पण बाळगून चला. गुरमेहर च्या पूर्ण साप्ताहिकात 'प्रेरणा भारद्वाज' प्रकरण डोळ्यांसमोरून निसटून गेलं आपल्या. विश्वरूपम ला झालेला विरोध आणि पद्मावती साठी एकत्र आलेला 'Bollywood' आपला दशकांपासून आदर्श राहिलाच आहे.

                                   तुम्हाला देशभक्तीसाठी प्रवृत्त करणारी मंडळी घातक असेलही. पण त्यांना सरळ नका सोडून देऊ ज्यांनी तुमच्या विचारांना सुरुवातीपासून काबीज करायचा प्रयत्न केलाय.
अभिव्यक्ती
स्वातंत्र्य (Freedom of Speech) साठी अमेरिकेचं उदाहरण देणाऱ्या प्रत्येकास ठाऊक असायला हवी अशी एक गोष्ट सांगतो, अमेरिकन कायद्याप्रमाणे देशांतर्गत सरकारविरुद्ध अथवा देशाविरुद्ध बोलणाऱ्या किंवा त्यासाठी कट रचणाऱ्या व्यक्तीस तुरुंगात डांबलं जातं. त्याचबरोबर त्या पत्रकारांना देखील ज्यांना अशा व्यक्तीसाठी चांगलं बोलण्याची हौस आहे. अर्थात तिथे अशा लोकांची काळजी दर्शवणे हा देखील गुन्हाच आहे. एक अजून महत्वाची माहिती हवी असेल तर सांगतो. 'उमरखालीद' चे वडील 'SIMI' मध्ये कार्यरत राहिलेले आहेत. हि माहिती आपल्यास ज्ञात असावी, बस इतकचं..


1 comment:

  1. सध्या चालू असलेला देशद्रोह व त्याचा समर्थन करणारा पत्रकार वर्ग..एखाद्या मुर्ख मुलीला मिळत असलेली पोपुलारिटी..फ्रीडम ऑफ़ स्पीच च्या नावाखाली होत असलेली दादागिरी..ज्या ताटात खातात त्याच ताटात कस घान करतात ही लोक..हा फ़क्त एक लेख नसून एक कटु सत्य आहे..तरुन पीढित अशी विचारसरणी पाहून आनंद झाला..
    धन्यवाद्.. करण

    ReplyDelete